farmers
farmers 
गोवा

शेतकर्यांच्या मागण्या पुर्ण झाल्यानंतरच खनिज माल उचलावा  

गोमन्तक वृत्तसेवा

वाळपई:मागण्या पूर्ण झाल्यानंतरच खनिज माल उचला
वाळपई येथे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची मागणी
पिसुर्ले-सत्तरी भागातील खाण व्यवसायामुळे शेती नष्ट झाली आहे.या पिसुर्ले भागात भात शेतीत खनिज गाळ साचून राहिला आहे.तो गाळ काढावा.खंदकातील पाणी शेती, बागायतीला पुरविणे. २०१७ पासूनची नुकसान भरपाई मिळावी, अशा तीन मागण्या शेतकऱ्यांनी खनिज कंपन्यांकडे केल्या होत्या.पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.मागील काही दिवसांपूर्वी डंप केलेला खनिज माल उचलण्याच्या हालचाली कंपन्यांनी सुरू केल्या होत्या.त्याला विरोध करीत आधी आमच्या मागण्या पूर्ण करा, नंतरच खनिज माल उचलावा, अशी भूमिका घेत पिसुर्लेतील शेतकऱ्यांनी वाळपई उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनाची दखल घेत उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर यांनी कार्यालयात आज बैठक घेतली.यावेळी शेतकरी वर्गाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत.तोपर्यंत खनिज माल कंपन्यांनी उचलू नये, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.बैठकीला उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, मामलेदार अनिल राणे सरदेसाई, तसेच पिसुर्लेतील शेतकरी हनुमंत परब, पंच देवानंद परब, पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर, सेसा कंपनीचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होते.
शेतकरी हनुमंत परब म्हणाले, २०१७ सालापासून खनिज कंपन्यांनी शेतीची नुकसान भरपाई दिली नाही.ती देणे आवश्यक आहे.तसेच खनिज खाणीच्या क्षेत्रात मोठे खंदक आहेत.या खंदकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिलेले आहे.ते पाणी शेती, बागायतीसाठी पुरविले गेले नाही.तसेच पाणी भरलेले असल्याने हे खंदक धोक्याचे बनलेले आहे.या भागात जवळ घरांची वस्ती आहे.या खंदकातील दरडीची माती कोसळण्याची भिती आहे.या दरडी कोसळत राहिल्यास खंदक बुजणार आहेत.म्हणूनच हे पाणी उपसले पाहिजे.शेती, बागायतीसाठी, गायींना पिण्यासाठी पुरविले तर फायद्याचे आहे. ही सर्व कामे खनिज कंपन्यांनी केले पाहिजे, असे परब म्हणाले.
पंच देवानंद परब म्हणाले, आपण या समस्येकडे नेहमीच लक्ष घालून आहे. गतवर्षी खनिज खंदकातील पाणी पुरविले होते.पण ते व्यवस्थित पोहचले नाही.म्णून या खंदकातील पाणी व्यवस्थितपणे लोकांना पुरविण्याची व्यवस्था आवश्यक आहे.पाणी पुरविले तर खंदकाचा धोका टळणार आहे.कारण या खंदकातील पाणी तुडुंब भरलेले आहे.उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर म्हणाले आपण पिसुर्ले भागात येत्या आठवड्यात भेट देऊन परिस्थितीची पहाणी करणार असून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार आहोत, असे स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Amit Shah Fake Video Case: अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स, दिल्ली पोलिस करणार चौकशी

Goa Today's Live News Update: मांद्रे आश्वे येथील दल्लास हॉटेल सील

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळीवर बॉम्ब असल्याची धमकी, यंत्रणा सतर्क; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT