नैसर्गिक संपदेचा विद्‍ध्वंस  
गोवा

खनिज कंपन्यांकडून नैसर्गिक संपदेचा विद्‍ध्वंस

Padmakar Kelkar

वाळपई

. कंपन्या जमिनी खणत गेल्या म्हणूनच येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वनाश होत गेला आहे. व्यवसाय वाढविण्याच्या नादात खनिज कंपन्यांनी पिसुर्ले भागातील नैसर्गिक संपदेचा विद्ध्वंस केल्याचा आरोप पिसुर्ले शेतकरी संघटनेने वाळपई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष हनुमंत परब, पदाधिकारी जयेश्वर गावडे यांची यावेळी उपस्थिती होती. हनुमंत परब म्हणाले, सुरवातीच्या काळात पिसुर्लेत हाताने खणून खनिज माती काढली जायची. १९८० पासून मशिनरींचा वापर केला जाऊ लागला. आज कंपन्यांच्या बेजबाबदारपणामुळे १५२ शेतकरी वर्गांवर संकट कोसळले आहे. ८० एकर शेती बागायती जमिनी खनिज व्यवसायापायी नापिक बनलेल्या आहेत. १९९७ साली खनिज खंदकातील पाणी बागायतीला देत होते, पण २००० सालापासून शेती पूर्णपणे बंद स्थितीत आहे. शेतात माती साचल्याने पीक घेणे बंद झाले. पाण्याचे स्त्रोत बंद झाले. आज खनिज खंदकात पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेले असून हे खंदक कधीही फुटून त्याचा परिणाम देऊळवाडा, हरिजनवाडा आदी वाड्यांवर होणार आहे.
खंदकाची भिंत फुटल्यास खनिज माती पाण्यासोबत वाहून घरांमध्ये घुसणार आहे. अशी स्थिती वीस वर्षांपूर्वी खंदकाची भिंत फुटून खंदकातील पाणी वाहून घरांमध्ये चिखल साचला होता. तीच घटना पुन्हा होण्याची भीती आहे. म्हणूनच सरकारने या गंभीर गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी वर्गाला वेळेत नुकसान भरपाई दिली पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गेल्या वर्षी निवेदने दिली होती, पण वर्ष उलटले तरीही सरकारकडून कार्यवाही केलेली नाही. प्रसंगी शेतकरी वर्गाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आता संबंधित अधिकारी वर्गांनी भागाची पहाणी केली आहे, पण अजून कंपनीने खंदकातील पाणी उपसणे सुरू केलेले नाही. केवळ पंप आणून ठेवले आहेत. पिसुर्लेतील खनिज खंदकातील पाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात साचलेले आहे. सध्या भर पावसाळ्यात लोकवस्तीतून खनिज वाहतूक केली जात आहे, पण सरकारी यंत्रणा कारवाई करण्यास तयार नाही, असेही परब म्हणाले.

संपादन - यशवंत पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT