valmiki naik
valmiki naik 
गोवा

सरकार व खाण लॉबीचे संगनमत ः आप

Dainik Gomantak

पणजी

 खाण बंदीवर “वैधानिक उपचार” शोधण्यासाठी केंद्राकडे केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री, राज्यपाल आणि गोवा खनिज निर्यात संघटनेने  (जीएमओईए) वापरलेली एकाच तऱ्हेची भाषा, लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारवर शक्तिशाली माइनिंग लॉबीची कशी पकड आहे ते दर्शवते असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. 
खाण उद्द्योजकांनी बेकायदेशीर रितीने चालवलेल्या खाण व्यवसायावर सुप्रीम कोर्टाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे २०१२ पासून बंदी असलेल्या खाण उद्योगामध्ये गोव्यास सध्याच्या आर्थिक संकटातून मुक्त करण्याची क्षमता आहे. परंतु त्यासाठी खाण लॉबीकडे असलेल्या संबंधांच्या साखळ्या मोकळ्या करुन सरकारने खनिज विकास महामंडळामार्फत शाश्वत, नियंत्रित व स्वच्छ खाण व्यवसाय सुरू करण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणू संकटाच्या अगोदरच्या काही महिन्यांत महामंडळाच्या या पर्यायाची कल्पनादेखील चर्चेत आली होती, परंतु आता असे दिसते आहे की खाण लॉबी स्वतःचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत आहे. गोव्याची खनिज संपत्ती पुन्हा एकदा लुटण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे असे आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी म्हटले आहे.
जर एखाद्याला हवे असेल तर, सध्याच्या संकटाकडे राज्य मालकीच्या खाण व्यवसायाविशयी पुरोगामी निर्णय घेऊन जनता आणि अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी एक दुर्मिळ संधी म्हणून पाहिले जाऊ शकते. परंतु खाण पट्टीतील भाग असल्याचा आरोप असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अशा कारभाराची आपण अपेक्षा करू शकतो का? असा प्रश्न वाल्मिकी नाईक यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

SCROLL FOR NEXT