Highlights from the governments proposal
सरकारच्या प्रस्तावातील ठळक मुद्दे
- हमीभाव (एमएसपी) कायम रहाणार
- कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजेच एपीएमसीची व्यवस्था कायम ठेवण्याची लेखी हमी.
- ''एपीएमसी’ कायद्यात केवळ पॅनकार्ड आवश्यक असल्याच्या अटीच्या पुढे जाऊन व्यापक बदल करण्याची तयारी.
- कंत्राटी शेतीत फसवणूक झाली तर, शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याची तरतूद दुरूस्त करणार
- शेतमाल खरेदी करणाऱ्या खासगी भांडवलदारांना नोंदणी करणे व कर आकारणे आवश्यक करणार. मात्र, तसे करणे संबंधित राज्य सरकारांना वाटले तर, ती दुरूस्ती करावी.
- वीज दुरूस्ती विधेयकात शेतकऱ्यांच्या आक्षेपांचे निराकरण करू. (नेमके काय करणार ते स्पष्ट नाही.)
- शेतकऱ्यांना त्यांच्या फसवणुकीसाठी न्यायालयात जाण्याची परवानगी देण्यासही नकार देणाऱ्या या कायद्यांत आता केवळ न्यायालयांत जाण्याचीच दुरूस्ती करण्यात येणार नसून शेतकऱ्यांसाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचा विचार सरकार करेल
- कंत्राटी पद्धतीने शेती करताना शेतकऱ्यांची जमीन कोणी बळकावू शकणार नाही अशी दुरूस्ती करणार.
- पराली जाळण्यासाठी शिक्षा करण्याबाबत प्रदूषण नियंत्रण कायद्यात दुरूस्तीचा ‘विचार’ केला जाईल.