The country needs four capitals demanded Mamata Banerjee
The country needs four capitals demanded Mamata Banerjee 
देश

‘देशाला चार राजधान्या हव्यात’, ममता बॅनर्जी यांनी केली मागणी

गोमंतक वृत्तसेवा

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाला फक्त दिल्लीतच राजधानी नको तर आणखी चार राजधान्या स्थापन करण्याची मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.

''भारताला चार राजधान्या असायला पाहिजेत असे माझे हे वैयक्तिक मत आहे. भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी कोलकात्यात बसून राज्य केले. तर आपल्या देशात राजधानीचे शहर एकच का?'' असा सवाल यावेळी ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की,'नियोजन आयोगाची पुन्हा नव्याने स्थापन करावी. केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर नियोजन आयोगाच्या ठिकाणी निती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. नियोजन आयोग आणि निती आयोग एकत्र राहू शकतात. नियोजन आयोग स्थापन करण्याची संकल्पना ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची होती.'

''नेताजींनी जेव्हा भारतीय लष्कराची स्थापना केली होती, तेव्हा त्यांनी गुजरात, बंगाल, तमिळनाडू या भागातील लोकांना आपल्या लष्करात सामावून घेतले होते. ब्रिटीशांनी भारताला विभाजित करण्यासाठी अवलंबलेल्या फोडा आणि राज्य करा या धोरणाच्या विरोधात प्रकर्षाने उभे राहिले होते. आपण आझाद हिंद स्मारक उभा करुया आणि त्याचे काम कशापध्दतीने केले जाते ते पण आपण दाखवून देऊ’’  असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT