Tripurari Pournima Victory of good power over demonic power
Tripurari Pournima Victory of good power over demonic power 
ब्लॉग

आज-उद्या त्रिपुरारी पौर्णिमा

गोमन्तक वृत्तसेवा

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री शंकराने त्रिपुरासुराचा नाश केला, त्याप्रित्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. हा देवांचा उत्सव असून असुरी शक्तीवर चांगल्या शक्तीचा विजय म्हणून तो भारतातील बऱ्याच ठिकाणी मंदिरांतून साजरा केला जातो. यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला प्रारंभ आज (दुपारी १२.४८ वाजता) होत असून या पौर्णिमेची समाप्ती ३० नोव्हेंबरला (दुपारी३.०० वाजता) होत आहे. या उत्सवामागील इतिहास आणि त्याचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून समजून घेऊया. 


त्रिपुरारी पौर्णिमा हा उत्सव कार्तिक पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. ‘त्रिपुरयादैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले.मध्यंतरी इतर देवांनी त्याच्याआराधनेत विघ्नआणण्यासाठी पुष्कळ खटपटकेली; परंतु ती व्यर्थ गेली. ब्रह्मदेव वर देण्यास सिद्ध झाला. त्रिपुराने ‘मला अमरत्व प्राप्त व्हावे’, असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष श्री विष्णूसही त्या त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. शेवटी शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्या दैत्याचा वध करून देवांचे गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिले.आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांस आनंदी आनंद झाला आणि त्यांनी शंकराची स्तुती करून दीपोत्सव केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेसहा उत्सव साजरा केला जातो.’


त्रिपुररी पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला सभोवती दिवे लावण्याची व्यवस्था करून तिथे दिवे लावले जातात. या खांबांना त्रिपुरी म्हणतात. तेजाचे अधिष्ठान असलेला हा दिवस दिपोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.
- तुळशीदास गांजेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT