नाहीतर गोव्याचे वाळवंटात रुपांतर होईल! IIT मुंबईचा अहवाल भाजपसाठी धोक्याची घंटा असे आलेमाव का म्हणताहेत?

जमिनीची होणारी धूप विनाशकारी तीन रेषीय प्रकल्पांचा पुनर्विचार करण्यासाठी भाजप सरकारसाठी धोक्याची घंटा आहे
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

Soil erosion report on Goa by IIT Bombay: मातीच्या होणाऱ्या धूपबाबत आयआयटी- मुंबईचा अहवाल भाजप सरकारसाठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे त्यांनी विनाशकारी तीन रेषीय प्रकल्पांवर पुनर्विचार करावा, असे गोव्याचे विरोधी पक्षनेते (एलओपी) युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

कर्नाटक ते गोव्यातील वास्को दरम्यान रेल्वेमार्ग, 400 केव्ही पॉवर ट्रान्समिशन लाइन टाकणे आणि कर्नाटक आणि गोवा दरम्यान महामार्गाचे रुंदीकरण या सर्वांचा भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि मोले नॅशनल पार्कवर परिणाम होईल, अशी भीती असल्याने लोकांनी याला विरोध केला आहे.

"आयआयटी- मुंबईच्या अभ्यास अहवालात असे दिसून आले आहे की 1,600 किमी लांबीच्या पश्चिम घाट क्षेत्राचे नयनरम्य युनेस्को जागतिक वारसा स्थळ (WGR), पृथ्वीवरील 35 जैवविविधता हॉटस्पॉट्सपैकी एक आहे, जमिनीचा प्रचंड आणि वेगाने धूप होत आहे. जमिनीची होणारी धूप विनाशकारी तीन रेषीय प्रकल्पांचा पुनर्विचार करण्यासाठी भाजप सरकारसाठी धोक्याची घंटा आहे," असे युरी आलेमाव म्हणाले.

दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने (IITB) नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या डेटाचा अभ्यास करण्याची आणि सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच, गोवा सरकारने युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे, असे आलेमाव म्हणाले

"मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आयआयटी-बॉम्बे टीमला गोवा विधानसभेचे सर्व सदस्य आणि पर्यावरण कार्यकर्त्यांसमोर सादरीकरण देण्यासाठी आमंत्रित करावे. आम्ही म्हादई गमावली आहे, आता कृती केली नाही तर आम्ही जैवविविधतेने समृद्ध पश्चिम घाट देखील गमावू आणि गोव्याचे वाळवंटात रुपांतर होईल," असे आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com