Panaji News : विरोधकांनी स्वप्नेच पहावी! बाबूश मोन्सेरात

Panaji News : ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीनंतर ‘गोमन्तक'' टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, आपण ताळगावचा किंग नाही तर लोक किंग आहेत.
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, ‘पणजी मी कधीच सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पुरी होणार नाहीत. मला पक्षावर विश्वास आहे. ज्यांच्याकडे लोक आहेत, त्यालाच पक्षात किंमत आहे.

जनमत असेल तरच पक्ष तिकीट देतो आणि माझ्याकडे जनमत आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे,‘ असे मत आमदार बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केले.

ताळगाव पंचायतीच्या निवडणुकीनंतर ‘गोमन्तक'' टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, आपण ताळगावचा किंग नाही तर लोक किंग आहेत. ताळगावातील लोकांनी पुन्हा एकदा आपल्यावर विश्‍वास टाकलेला आहे. निवडणूक होण्यापूर्वीच विरोधक आपल्यावर आरोप करतात, हे योग्य नाही. म्हणजेच ते अगोदरच पराभव स्वीकारतात काय? त्यांनी विरोधकांनी बसावे, स्टॅटजी राबवावी. आज विरोधात निकाल गेला असता, तर आपण त्या पराभवास कारणीभूत ठरलो असतो.

आपण सतत मतदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. निवडणुकीत मतदार हा सर्वोच्च असतो, निवडणुकीच्या निमित्ताने लोकांना भेटण्याची एक संधी मिळते. आपण लोकांचा पाठिंबा मागतो, परंतु त्याचबरोबर घरी बसून दुसऱ्याच्या समस्या जाणू शकत नाही.

त्यामुळेच लोकांनी आपल्या समस्या माझ्याकडे मांडाव्यात म्हणून त्यांना आवाहन करीत असतो. कारण पाच वर्षांनी तू आलास काय? असे विचारू नये असा आपला प्रयत्न असतो.

कोणतीही समस्या असल्यास मतदारांनी आपल्याकडे यावे, असे सांगत बाबूश म्हणतात, आपण जमिनीवर राहून काम करणारे आहोत. मंत्रिपद आज आहे उद्या नाही. त्यामुळे जनतेबरोबर राहणे अधिक महत्त्वाचे असते. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ताळगाव मार्केटची इमारत करण्याचे आश्‍वासन दिले होते, ते झाले नाही.

परंतु यावेळी काम सुरू होईल. ताळगावात आपला प्रतिनिधी आहे, आपण पुन्हा ताळगावात येणार नाही. पणजी आपण कधीच सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाही, ती स्वप्नेच राहतील, असा टोलाही त्यांनी पणजीतील राजकीय प्रतिस्पर्धी उत्पल पर्रीकर यांना अप्रत्यक्षरीत्या लगावला आहे.

आपण पक्षाबरोबर राहिलो आहे आणि पक्षाच्याविरोधी काम केलेले नाही. तीन वर्षांनी निवडणूक आहे, त्यामुळे २०२७ मध्ये पाहूया, असे त्यांनी नमूद केले.

Panaji
PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

जमिनी विकणाऱ्यांना रोखणार कसे?

चौकटताळगावातील जमिनी विक्रीचा विरोधकांकडून आपल्यावर होणाऱ्या आरोपात अजिबात तथ्य नाही. जमिनी विकण्यासाठी जर लोक पुढे आले असतील, तर त्यांना आपण कसे अडवू शकतो. सध्या ताळगावात ज्या जमिनी राहिल्या आहेत, त्या कोमुनिदादच्या आहेत, असे मोन्सेरात यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com