कवळे पंचायतीच्या ग्रामसभेत कचऱ्याच्या विषयासह बेकायदा दारूची दुकाने, नादुरुस्त पथदीप व इतर विषयांवरून गरमागरम चर्चा झाली. आज (रविवारी) झालेल्या या ग्रामसभेत सरपंच मनुजा नाईक यांनी स्वागत केले तर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला.
कवळे पंचायतक्षेत्रातील ओल्या कचऱ्याचा प्रश्न जटील झाला असून मागच्या काळात पंचायतीसमोर सुरू केलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम बंद असल्याने पंचायतीचे चाळीस लाख पाण्यात गेल्यात जमा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
मशिनरी चालत नसल्यास ती काढून टाकावी पंचायतीने पैसे वसूल करावे, अशी सूचना ग्रामस्थांनी केली.
ओल्या कचऱ्यावरून ग्रामसभेत मोठी चर्चा झाली. कचरा प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या उभारणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, त्यावर पंचायतीतर्फे कचरा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन जागेचा शोध सध्या सुरू असून ग्रामस्थांकडून यासंबंधी सूचनाही मागवल्याचे सांगण्यात आले.
मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासंबंधीही यावेळी चर्चा झाली. गावातील विजेचे पथदीप लागत नसल्याने अपघात होत आहेत. पथदीप दुरुस्त करावेत, अशी सूचनाही ग्रामस्थांनी केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.