पणजी, उन्हाळ्याच्या सुट्टीत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या तिकीट दरावर नियंत्रण आणा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची शाखा ‘सुराज्य अभियान’ या संस्थेने गोव्याच्या वाहतूक खात्याकडे केली आहे.
यासंबंधीचे निवेदन वाहतूक खात्याचे उपसंचालक बी.ए. सावंत यांना देण्यात आले. हे निवेदन देताना ‘सुराज्य अभियान’च्या शिष्टमंडळामध्ये सुशांत दळवी, मिहीर दळवी आणि दिलीप शेट्ये यांचा समावेश होता.
शाळांना उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर मागणी वाढल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसच्या तिकिटांचे दर नियमित दरापेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक वाढविले जातात. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो.
महाराष्ट्र राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसच्या तिकीट दरावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘जी.आर्.’ काढला आहे. त्यानुसार खासगी बसचालकांना राज्य शासनाच्या बसच्या तिकीट दरापेक्षा अधिकाधिक दीडपट दर आकारता येतो. अशाच प्रकारे गोवा सरकारनेही खासगी बसेसच्या तिकीट दरावर नियंत्रण आणणारा आदेश तातडीने जारी करावा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.