दाबोळी: ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत ३९ वे तसेच अबुधाबी ते गोवा दरम्यानचे पहिले विमान आज पहाटे गोव्यात दाबोळी विमानतळावर ५७ प्रवासी घेऊन दाखल झाले.
भारत सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत अबुधाबीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना घेऊन काल पहाटे पाच वाजता हे विमान दाखल झाले. दुबईस्थित गोमंतकीय कन्या विशांती कवठणकर खासकरून गोमंतकीयांना गोव्यात येण्यास सहकार्य करीत आहेत.
त्यामुळे अबुधाबीमध्ये असलेल्या गोमंतकीयांना गोव्यात येण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. गेले सात महिने विशांती कवठणकर यांनी अनेकांना गोव्यात परतण्यासाठी सहकार्य केलेले आहे. परवा मध्यरात्री अबुधाबीहून गोव्यात येण्यासाठी विमान निघाले व ते काल पहाटे दाबोळी विमानतळावर पोहोचले. एकूण ५७ प्रवासी या विमानातून दाखल झाले.
आणखी वाचा:
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.