RCb Virat.jpg
RCb Virat.jpg 
क्रीडा

IPL 2021: कर्णधार विराट कोहलीच्या 'एका चुकीमुळे' सामन्याचा निकाल बदलू शकला असता

दैनिक गोमंतक

टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव खूप महत्वाची असते कारण त्यावर तुमच्या संघाचा विजय किंवा पराजय देखील ठरू शकतो. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्रातील पहिला सामनाही असाच थरारक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. आरसीबीने जरी हा सामना आपल्या नावावर केला असला तरी, कर्णधार विराट कोहलीने केलेल्या एका चुकीमुळे हा विजय पराजयात बदलू शकत होता. (This mistake of captain Virat Kohli could have turned the victory of Mumbai Indians into defeat)

शुक्रवारी पार पडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 19 व्या षटकाचे चेंडू फेकणाऱ्या काईल जेम्सिनच्या तिसऱ्या बॉलला नो बॉल म्हटले गेले, कारण यावेळी थर्टी यार्ड सर्कलमध्ये फक्त तीन खेळाडू उपस्थित होते त्यामुळे पंचाने नो बॉल दिला. नियमांनुसार टी-ट्वेन्टी सामन्यात कोणत्याही वेळी चार क्षेत्ररक्षक थर्टी यार्ड सर्कलमध्ये असणे बंधनकारक असते. कोहलीच्या या चुकीमुळे मुंबईला धाव, अतिरिक्त चेंडू आणि फ्री हिट सुद्धा  मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या या सामन्यात कोहलीची ही चूक आरसीबीला भारी पडू शकली असते.  

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ख्रिस लिनच्या डावात 49 धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 षटकांत 9 विकेट गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी (RCB) संघाने शेवटच्या षटकात ग्लेन मॅक्सवेल (39) आणि एबी डिव्हिलियर्सने २७ चेंडूंत  48 धावा घेत त्याने तुफानी डाव खेळला, आणि त्यामुळेच  160  धावांचे लक्ष्य गाठण्यास रॉयल चॅलेंजर बंगळुरू (Royal Challengers Bangalore) चा संघ यशस्वी झाला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa Today's Live News Update: शापूर फोंडा येथे दुचाकींचा अपघात, दोघे जखमी

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT