Amarnath Panjikar blames BJP government
Amarnath Panjikar blames BJP government 
गोवा

मुख्यमंत्र्यांकडून फक्त सामान्यजनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम: अमरनाथ पणजीकरांची टीका

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: केवळ घोषणाबाजी करण्यात पटाईत असलेल्या भाजप सरकारने वीज बिलांतील निश्चित शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर पत्रकार परिषदेत केली. सुट-बुट वाल्यांचे सरकार घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

त्यांच्या सोबत माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, डिचोली गट अध्यक्ष मेघश्याम राऊत व समाज माध्यम प्रमुख प्रतिभा बोरकर होत्या. पणजीकर म्हणाले, केवळ आपली जाहिरातबाजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संकटात असलेल्या जनतेला कोरोनावर मात करण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यानी श्रीराम मंदिराच्या भूमि पुजन दिनी मोदींचे बॅनर लाऊन घरांवर रोषणाई करण्यास लोकांना सांगितले होते. त्यामुळे सरकारला आता लोकांनी विजेचा वापर जास्त केला म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही.

सरकारने निश्चित शुल्कात दिलेली ५० टक्के सवलत म्हणजे एकूण बिलाच्या रकमेतील २ टक्के सुद्धा होत नाही, असेही पणजीकर म्हणाले.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's News Wrap: शशी थरूर, पवन खेरा गोव्यात, शहांची शुक्रवारी सभा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT