farmer
farmer 
देश

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर शेतकरी रस्ते रिकामे करतील?

दैनिक गोमंतक

केंद्र सरकारने बनवलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील चार महिन्यांपेक्षा अधिक काळातून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करता आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे दिल्लीवरून विविध राज्यांना जोडणारे रस्ते बंद आहेत. परंतु, दिल्लीहून गाझियाबादला जाण्यासाठीचे मार्ग खुले आहेत. मात्र गाजियाबादहून दिल्लीकडे जाणारा रस्ता खुला झाला नाही. चळवळीच्या प्रारंभीच्या काळात नोएडामधील रस्तेही विस्कळीत झाले होते, त्या विरोधात एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्याची सुनावणी करीत असताना सर्वोच्च न्यायालयाने निषेधाच्या वेळी सार्वजनिक रस्ते रोखू नयेत, असे म्हटले आहे. 

नोएडा आणि दिल्ली दरम्यान वाहतूक सुरू करावी यासाठी या महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय रस्ते रिकामे करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी देखील या महिलेने याचिकेत न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर उत्तर देताना रस्त्यांवर वाहतुकीचा प्रवाह मुक्त असावा, असे नमूद केले आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीकडे जाणारे अनेक रस्ते बंद आहेत. याचा परिणाम कार्यालयीन, पर्यटक, व्यावसायिक आणि इतर प्रवाशांवर होत आहे. त्यांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. 


दरम्यान, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी तिन्ही कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करीत आहेत. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत, परंतु अजून तोडगा निघालेला नाही. हे तीनही कायदे मागे घ्यावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Goa Today's Live News: मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

स्वतःच्या मालकीचा शॅक दुसऱ्याला दिल्याने HC ने 'जीसीझेडएमए’ला नोटीस बजावण्याचे दिले आदेश

Lok Sabha Election 2024: ''लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसींच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार''; CM सावंत यांची ग्वाही

Lok Sabha Election 2024: तिसवाडीत एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क; खिस्ती मते ठरणार निर्णायक

SCROLL FOR NEXT