अनेक वेळा कार खरेदी केल्यानंतर लोक निष्काळजीपणे प्रवास करतात. त्यामुळे वाहनांच्या अनेक भागांचे नुकसान होते. तसेच निष्काळजीपणामुळे गाडीच्या टायरवरही विपरीत परिणाम होतो.
पण व्हील अलाइनमेंट केल्याने गाडीचे टायर जास्त दिवस चांगले राहतात. यासह, अलाइनमेंट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
चाकांचे अलाइनमेंट का महत्वाचे आहे?
जेव्हा कार चालवली जाते तेव्हा कारचे संपूर्ण वजन टायरवर असते. टायर कार आणि रस्ता यांच्यात संपर्क निर्माण करण्याचे काम करतात. यामुळे टायरमध्ये बिघाड झाल्यास अनेक समस्यांचा धोकाही वाढतो. म्हणून, कारसाठी व्हील अलाइनमेंट करणे खूप महत्वाचे आहे.
मिळतो लाभ
जर कारमध्ये चाकांचे अलाइनमेंट वेळेवर केले गेले तर ते टायरचे आयुष्य वाढवण्यास मदत करतात. यासोबतच राईडचा दर्जा सुधारण्यासही मदत होते. गाडी चालवताना गाडी एका दिशेला गेली आणि स्टेअरिंगमध्ये कंपन होत असले, तरी व्हील अलाइनमेंट करून ही समस्या दूर करता येते.
पुढील गोष्टींची घ्या काळजी ?
कार व्हील अलाइनमेंट करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नियमित अंतराने चाकांचे अलाइनमेंट करावे. कार तज्ज्ञांच्या मते, तीन ते चार हजार किलोमीटरनंतर व्हील अलाइनमेंट करून घेणे चांगले असते. चाकांचे अलाइनमेंट आपल्या घराजवळ चांगल्या ठिकाणी केले पाहिजे, जेणेकरून अलाइनमेंट कधीही बिघडले तर ते दुरुस्त करणे सोपे होईल. सेंटरवर स्वयंचलित सेट-अप असल्यास अलाइनमेंट अधिक चांगले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.