Goa Marathi Academy: स्वार्थापोटी नेत्यांकडून भाषावादाला खतपाणी

साखळीत समारोपाच्या भाषणात प्रा. भालेराव यांचे मत
Goa Marathi Academy
Goa Marathi AcademyDainik Gomantak

साहित्यिक कधीच भाषावाद करीत नाही. तर याला राजकारणी जबाबदार असतात. आपल्या राजकीय स्वार्थापोटी भाषावादाला राजकारणी खतपाणी घालतात, असे परखड मत कवी प्रा.इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले. चौथ्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

गोवा मराठी अकादमी आणि साखळीच्या सरकारी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने साखळीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय चौथ्या मराठी संमेलनाचा रविवारी सायंकाळी साखळीत समारोप झाला.

काही साहित्यिक अन्य साहित्यिकांच्या साहित्याचा आस्वाद घेत नाही अशी खंत व्यक्त करत भाषेची समृद्ध परंपरा आणि संस्कृती पुढे नेण्याची जबाबदारी तरुणाईची असल्याचे मतही भालेराव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी साहित्यिकांशी संवाद साधला.

गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सावंत, लेखिका प्रा. पौर्णिमा केरकर आणि अन्य साहित्यिक तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे समारोप झाले. समारोप सोहळ्यात चंद्रकांत कृ. गावस, दिलीप शेर्लेकर आणि तुषार टोपले यांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही पार पडला.

बोरकर वादात भरडले गेले

कविवर्य बा. भ. बोरकरांना जो मान मिळायला हवा, तो भेटला नाही असे म्हटले जाते. जोपर्यंत मराठी-कोकणी वाद सुरू झाला नव्हता. तोपर्यंत बोरकर हे मराठी साहित्यातील प्रमुख कवी होते, याबाबत शंका नाही. बोरकर तेच होते.

परंतु वाद निर्माण झाल्यावर ते भरडले गेले. इतर साहित्यिकांच्या ठिकाणावरून वाद कधी निर्माण झाला नाही. राजकारणी लोक पक्षाच्या, पदाच्या निवडणुकीच्या स्वार्थासाठी खेळवत राहतात. आपण त्यात भरडले जाऊ नये. आपण आपल्या भाषेवर प्रेम करावे, असे प्रतिपादन भालेराव यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com