Sameer Amunekar
भारताने क्रिकेट जगताला ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी आणि सय्यद किरमाणी सारखे विकेटकीपर दिले. भारतासाठी कोणत्या विकेटकीपरने सर्वाधिक धावा केल्या आहेत ते जाणून घेऊया.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून एकूण ४८७६ धावा केल्या आहेत.
ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून एकूण ३२०० धावा केल्या आहेत. भारतासाठी विकेटकीपर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत सय्यद किरमानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी भारतासाठी विकेटकीपर म्हणून २७५९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून दोन शतके आणि १२ अर्धशतके झाली आहेत.
फारुख इंजिनिअरने भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून ४६ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २६११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि १६ अर्धशतके झाली आहेत.
नयन मोंगियाने भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून एकूण १४४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि ६ अर्धशतके झाली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.