Sameer Amunekar
भारतीय कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्माने संघाला चांगली सुरुवात दिली आणि ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
रोहित आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९० किंवा त्याहून अधिक ५०+ धावा करणारा फक्त ५वा भारतीय फलंदाज बनला आहे.
अंतिम सामन्यातील रोहितचे अर्धशतक हे त्याचे ५८ वे अर्धशतक होते आणि ३२ शतकांसह, भारतीय कर्णधार आता ९०+ अर्धशतकाच्या विशेष यादित सामील झालाय.
रोहित शर्मा व्यतिरिक्त, फक्त सौरव गांगुली (93), राहुल द्रविड (94), विराट कोहली (125) आणि सचिन तेंडुलकर (145) यांनीच ही कामगिरी केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावून रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही विशेष कामगिरी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.