Sameer Amunekar
भातामध्ये मुख्यत्वेकरून कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. पण अति प्रमाणात घेतल्यास हे शरीरात चरबी म्हणून साठू शकतात.
कोणताही अन्नघटक भात असो किंवा इतर तुम्ही जितक्या कॅलोरीज खर्च करता त्यापेक्षा जास्त घेतल्यास वजन वाढते.
पांढऱ्या तांदळाच्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे तो झपाट्याने रक्तात साखर वाढवतो, ज्यामुळे भूक लागते आणि ओव्हरइटिंग होते.
फायबरयुक्त भात जसे की ब्राउन राईस किंवा लाल तांदूळ हे पचनासाठी चांगले आणि वजन नियंत्रणात ठेवणारे ठरू शकतात.
भात खाण्याबरोबरच प्रोटीन (डाळ, पनीर, मासे) आणि फायबरयुक्त भाज्यांचा समावेश केल्यास वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
रात्री शरीराची चयापचय क्रिया मंदावते, त्यामुळे रात्री भात खाल्यास त्याचं पचन नीट होत नाही आणि वजन वाढण्याची शक्यता असते.
भात हा पूर्णपणे टाळायचा नाही, मात्र प्रमाणात आणि संतुलित आहारात घेतल्यास तो आरोग्यासाठी हानिकारक नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.