Sameer Amunekar
या बेटाचे अधिकृत नाव 'इल्हा दा क्वेइमाडा ग्रांडे' आहे. येथे जगातील सर्वात विषारी मानल्या जाणाऱ्या 'गोल्डन लान्सहेड' सापांचे राज्य आहे. असे म्हटले जाते की, येथे प्रत्येक चौरस मीटरवर १ ते ५ साप आढळतात.
कॅलिफोर्नियामधील हे वाळवंट पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे. येथे उन्हाळ्यात तापमान ५६.७°C पर्यंत पोहोचू शकते. पाण्याशिवाय येथे कोणताही माणूस फार काळ जिवंत राहू शकत नाही, म्हणूनच याला 'मृत्यूची दरी' म्हणतात.
हे ठिकाण पाहिल्यावर तुम्हाला दुसऱ्या ग्रहावर असल्याचा भास होईल. येथे अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत जे सतत विषारी वायू सोडत असतात. येथील प्रचंड उष्णता आणि सल्फरचे तलाव मानवी जीवनासाठी अत्यंत घातक आहेत.
हे ठिकाण त्याच्या खराब हवामानासाठी जगभर कुप्रसिद्ध आहे. येथे वाऱ्याचा वेग ताशी ३७२ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, जो जगात सर्वाधिक आहे. तसेच येथील तापमान उणे ४० अंशांपर्यंत खाली जाते, ज्यामुळे येथे जाणे अत्यंत कठीण होते.
अंदमान बेटांचा भाग असलेले हे ठिकाण बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त आहे. येथे राहणारी 'सेंटिनेली' जमात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आपल्या बेटावर येऊ देत नाही आणि त्यांच्यावर बाणांनी हल्ला करते. भारत सरकारने येथे जाण्यास कायदेशीर बंदी घातली आहे.
हे सरोवर दिसायला खूप सुंदर आणि लाल रंगाचे दिसते, पण प्रत्यक्षात ते अत्यंत कास्टिक (क्षारीय) आहे. येथील पाण्याचे PH मूल्य १२ पर्यंत असू शकते, जे कोणत्याही प्राण्याच्या त्वचेला आणि डोळ्यांना जाळून टाकण्यासाठी पुरेसे आहे.
हे उद्यान दिसायला अतिशय निसर्गरम्य आहे, पण येथे जगातील सर्वात विषारी आणि धोकादायक प्राणी तसेच वनस्पती आढळतात. येथील काही झाडांच्या पानांना स्पर्श केल्यास तीव्र खाज सुटून माणूस आजारी पडू शकतो.