गोमन्तक डिजिटल टीम
हिवाळा सुरु झाला असून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. मात्र या काळात आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे या दिवसात प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते.
थंड हवामानात गरम आणि पौष्टिक पदार्थ खावे. या दिवसात सूप, ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर ठरते. लिंबू, संत्री, आवळा यांसारखे फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
काही लोकांना थंडी ही सहन होत नाही. यामुळे सर्दी किंवा फ्लूच्या तक्रारी वाढतात. अशा वेळी स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
लहान मुलांना उबदार कपडे घालावेत. डोके, कान, नाक झाकलेलं ठेवल्यास संक्रमणाचा धोका टळू शकतो.
आले, दालचिनी आणि वेलची यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती त्यांच्या तापमानवाढ गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी चहाचे सेवन करू शकतात.
कोरड्या त्वचेसाठी क्रीम किंवा लोशन लावा. ओठ सुकणार नाहीत यासाठी लिप बाम वापरा.
थंडीच्या दिवसात सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवा, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश फायदेशीर आहे.