गोवा मुक्तीसाठी लष्कराचा वापर करण्यास पंतप्रधान नेहरू का घाबरत होते?

Akshay Nirmale

भारत स्वतंत्र पण गोवा नाही

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला तरी गोव्यावर मात्र पोर्तुगीजांचे राज्य असल्याने गोवा स्वतंत्र झाला नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षांनी गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला.

Goa | Dainik Gomantak

पोर्तुगीजांचा नकार

1947 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा आणि इतर भागावरील त्यांचा अधिकार सोडण्यास नकार दिला. भारताने 1955 मध्ये गोव्यावर आर्थिक निर्बंध लादले. पण तरीही पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली नाही.

goa | Dainik Gomantak

राजनैतिक प्रयत्न अयशस्वी

राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्त करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

Jawaharlal Nehru | google image

नेहरूंची काळजी

पोर्तुगाल 'नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन' (नाटो) चा सदस्य होता. त्यामुळे पोर्तुगीजांविरोधात लढणे सोपे नव्हते. कारण त्यांना नाटो देशांचा पाठिंबा होता. यामुळे लष्करी बळाचा वापर करणे नेहरूंना नको होते.

Nato | google image

पोर्तुगीजांचा गोळीबार

नोव्हेंबर 1961 मध्ये पोर्तुगीज सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एका मच्छिमाराचा मृत्यू झाला. त्यानंतर पंतप्रधान नेहरूंनी लगेचच संरक्षण मंत्री केव्ही कृष्ण मेनन यांच्याशी बैठक घेत लष्करी कारवाईचा निर्णय घेतला.

Jawaharlal Nehru | google image

ऑपरेशन विजय

या बैठकीनंतर 17 डिसेंबर रोजी ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले, ज्याचा उद्देश गोवा मुक्त करणे हा होता. या मोहिमेअंतर्गत नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे 30 हजार सैनिक तैनात केले.

Goa | Dainik Gomantak

36 तासांत स्वातंत्र्य मिळाले

अवघ्या 36 तासांत 19 डिसेंबर 1961रोजी पोर्तुगीजांनी शरणागती पत्करली. तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मेन्यू वासालो डी सिल्वा यांनी आत्मसमर्पण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.

Goa | Dainik Gomantak
Russia Used Veto Against Portugal | Dainik Gomantak