Manish Jadhav
आजच्या काळात मुली कोणत्याही बंधनात न अडकता स्वतःचे भविष्य आणि करिअर घडवण्याला पहिली पसंती देतात.
'कुठे गेली होतीस?', 'कोणाशी बोलतेस?' अशा टोमण्यांशिवाय स्वतःच्या अटींवर जगणे आणि स्वतःसाठी मोकळा वेळ (Me Time) मिळवणे मुलींना जास्त आवडते.
भूतकाळातील 'हार्टब्रेक' किंवा नात्यातील कटू अनुभवांमुळे अनेक मुली पुन्हा कोणावरही विश्वास ठेवण्यास घाबरतात आणि सिंगल राहणेच सुरक्षित समजतात.
रोजची भांडणे, संशय आणि नात्यातील मानसिक ताणतणाव सांभाळण्यापेक्षा सिंगल राहून शांततेत जगणे आजच्या पिढीतील मुलींना जास्त सोयीचे वाटते.
आजच्या मुली आर्थिकदृष्ट्या खंबीर आहेत. स्वतःचे खर्च स्वतः उचलण्याची ताकद असल्याने त्यांना कोणत्याही गरजांसाठी पार्टनरवर अवलंबून राहावे लागत नाही.
केवळ नावापुरते किंवा तडजोड म्हणून नात्यात अडकण्यापेक्षा, जोपर्यंत विचारांशी जुळणारा आणि आदर करणारा योग्य जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत मुली थांबणे पसंत करतात.
स्वतःवर प्रेम करणे, स्वतःचे छंद जोपासणे आणि कोणत्याही बंधनांशिवाय मित्रमैत्रिणींसोबत बिनधास्त लाईफ एन्जॉय करणे यातच अनेक मुलींना खरा आनंद मिळतो.