Akshata Chhatre
प्रेमविवाह म्हणजे आयुष्यभरासाठीची सोबत प्रेमानेच सुरू झालेली असते. पण तरीही काही वेळा या नात्यात दुरावा येतो आणि काही जण विवाहबाह्य संबंधात अडकतात.
हे फक्त एका चुकीमुळे होत नाही, तर अनेक मानसिक, भावनिक आणि सामाजिक कारणांचा परिणाम असतो. चला तर, हे कारणं समजून घेऊया.
लग्नानंतर अनेक वेळा जोडीदार एकमेकांकडे लक्ष देणं कमी करतात. समजून घेणं, ऐकून घेणं, आधार देणं या गोष्टींचा अभाव झाला की भावनिक अंतर वाढतं.
दीर्घकाळ चाललेलं नातं काही वेळा एकसुरी वाटू लागतं. त्यात रोमँटिकपणा, नवा उत्साह हरवलेला असतो. अशावेळी नवीन ओळख, नवीन नातं हे थोडक्यात “रिफ्रेशमेंट” वाटू लागतं.
नात्यात सतत वाद, मतभेद, एकमेकांबद्दल अविश्वास असेल तर भावनिक दरी अधिकच वाढते. मग तिथून पळ काढण्यासाठी काही लोक बाहेरचं सहारा शोधतात.
जर दोन व्यक्तींच्या गरजा, विचार, अपेक्षा खूपच वेगळ्या असतील आणि त्यांच्यात संवादही कमी असेल, तर जवळीक आणि जुळवून घेण्याची भावना कमी होते.