Akshata Chhatre
काही विवाहित पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होतात, हे वास्तव आहे. मात्र हे सर्व पुरुषांबाबत खरं नाही. प्रत्येक नात्याचा पाया वेगळा असतो, आणि प्रत्येकाची भावनिक गरजही भिन्न असते.
संशोधनानुसार, आकर्षक चेहरा पाहिल्यावर पुरुषांच्या मेंदूतील डोपामिनचे प्रमाण वाढते. हे स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मात्र प्रत्येकावर असते.
अनेक पुरुषांना अटेन्शन हवं असतं, तसंच अनेक स्त्रियांना भावनिक संवादाची गरज असते. जेव्हा हे गरजेचं संतुलन बिघडतं, तेव्हा बाहेर आकर्षण वाढतं. म्हणून संवाद, सुसंवाद आणि समजुतदारी हे नात्याचं मूळ असावं.
एकमेकांशी खुलेपणाने संवाद साधा. जर आकर्षण वाटत असेल, तर त्यामागचं कारण शोधा – ते आपल्या नात्याची कमतरता आहे का? जोडप्यांनी वेळोवेळी 'री-कनेक्ट' होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
सुखी लग्न म्हणजे फक्त एकमेकांशी संवाद साधणं नाही, तर एकमेकांशी खऱ्या अर्थाने जोडणं. काही पुरुषांचं लक्ष इतर स्त्रियांकडे जातं यामागे असमाधान, बदलाची ओढ किंवा भावनिक दरी असू शकते.
मात्र अशा वेळी आत्मपरीक्षण, संवाद आणि जबाबदारीची जाणीव गरजेची असते. नातं टिकवण्यासाठी दोघांचाही समविचार आणि परस्पर आदर हाच खरा उपाय आहे.