Akshata Chhatre
गोव्यातील मांडवी नदीवरील अटल सेतु ५.१ किलोमीटर लांब पुल आहे. हा पुल पणजी आणि पर्वरीला जोडतो.
गोव्यातील विविध राजकारणी आणि सोशल मिडियावर लोकं या पुलाचे नाव डॉ. जॅक डी. सिक्वेरा किंवा दयानंद बांदोडकर यांच्या नावावर ठेवण्याची मागणी करत होते.
अटल सेतुचा उद्देश म्हणजे गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुलभ करणे हा आहे. या पुलामुळे पर्वरी ते पणजीचा प्रवास सहज शक्य होतो.
अटल बिहारी वाजपेयी यांचे भारतातील पायाभूत संरचनांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राजकारणात पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली.
अटल सेतुला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देणे हा एक सन्मानात्मक निर्णय होता. या नावामुळे कायम वाजपेयींच्या कर्तृत्वाचे स्मरण राहते.
गोव्यातील नेत्यांचे महत्व असले तरी अटल बिहारी वाजपेयींच्या कामाचा राष्ट्रीय पातळीवरील कार्याचा आढावा घेऊन हे नाव देण्यात आलं.
अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, म्हणूनच त्यांच्या नावावर पुलाचे नाव अटल सेतू ठेवण्यात आले. अटलजी कायम माणसांना जोडून ठेवायचे आणि म्हणूनच दोन शहरांना जोडणारा हा पूल त्याच्या महत्त्वामुळे या नावाने ओळखला जातो.