Akshata Chhatre
आपण लहानपणी अकबर-बिरबलच्या अनेक गोष्टी ऐकल्यात, पण एवढा हुशार आणि चतुर मंत्री म्हणजेच बिरबल नेमका होता तरी कोण?
बिरबल बद्दल काही ठोस पुराव्यानिशी बोलता येत नसलं तरीही मिळालेल्या माहितीनुसार एका साध्या कुटुंबात जन्मलेले महेश दास हाच बिरबल म्हणून ओळखला जातो.
हा महेशदास मूळचा उत्तर प्रदेशातील होता.त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याने इतिहासात अढळ स्थान मिळवलं. बिरबलला हिंदी, अवधी आणि पर्शियन या भाषांमध्ये लेखनाची विलक्षण कला अवगत होती आणि यामुळेच त्याचं नाव थेट बादशाह अकबरच्या कानावर पोहोचलं.
अकबरने त्याची बुद्धी पाहून त्याला आधी दरबारात स्थान दिलं, आणि नंतर त्याच्या चातुर्यामुळे "नवरत्नां"पैकी एक म्हणून नेमणूक केली.
यानंतर बिरबल फक्त किस्स्यांपुरते मर्यादित राहिला नाही तर तो अकबरचा खास सल्लागार बनला. राज्यकारभार, लष्करी धोरणं यासारख्या गंभीर विषयांमध्ये अकबर त्याचा सल्ला घेतला जात असे.
बिरबलचे किस्से इतके लोकप्रिय झाले की, त्याने अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर कधी-कधी अकबरलाही हुशारीने हरवलीच्या अनेक गोष्टी नंतरच्या काळात लिहिल्या गेल्या.