पृथ्वीवरील सर्व साप नाहीसे झाले तर... भयावह परिणाम होतील

Sameer Amunekar

उंदरांची संख्या वाढेल

साप हे उंदरांचे नैसर्गिक भक्षक आहेत. साप नसल्यास उंदरांची संख्या प्रचंड वाढेल, ज्यामुळे पिके नष्ट होण्याची शक्यता वाढेल.

Snake | Dainik Gomantak

शेती आणि अन्नसुरक्षेवर परिणाम

उंदीर व कीटक पिकांची नासधूस करतात. सापांची अनुपस्थितीमुळे कृषी उत्पादन घटेल, आणि अन्न टंचाईचा धोका निर्माण होईल.

Snake | Dainik Gomantak

पर्यावरणीय साखळीचा समतोल बिघडेल

साप हे अन्नसाखळीतील मध्यस्थ आहेत – ते काही प्रजातींचे भक्षक आहेत आणि काही प्रजातींना अन्न म्हणून काम करतात. त्यांची अनुपस्थिती ही साखळी कोसळवू शकते.

Snake | Dainik Gomantak

सापांवर अवलंबून असलेले प्राणी धोक्यात

साप खाणारे पक्षी, उंदीर पकडणारे प्राणी किंवा काही शिकारी प्रजाती सापांवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यांना देखील अन्नटंचाईचा सामना करावा लागेल.

Snake | Dainik Gomantak

सापांपासून मिळणाऱ्या औषधांचा अभाव

सापांच्या विषामधून अनेक औषधे बनवली जातात, विशेषतः न्यूरो आणि हार्ट संबंधित आजारांवर. यामुळे औषध क्षेत्राला मोठा धक्का बसेल.

Snake | Dainik Gomantak

मानवी जीवनावर धोका

उंदीर, घुबड व अन्य कीटकांमुळे पसरणाऱ्या रोगांची शक्यता वाढेल, ज्यामुळे आरोग्य संकट निर्माण होऊ शकते.

Snake | Dainik Gomantak

जैवविविधतेचा ढाचा कोसळण्याचा धोका

साप हे नैसर्गिक परिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या गायब होण्याने संपूर्ण जैवविविधतेचा ढाचा कोसळण्याचा धोका निर्माण होईल.

Snake | Dainik Gomantak

कोकणातल्या 'या' धबधब्यावर आहे काचेच पूल

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा