Manish Jadhav
विशालगडाचे जुने नाव 'खेळणा' होते. 11व्या शतकात शिलाहार राजांनी हा किल्ला बांधला होता. पुढे 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून त्याचे नाव 'विशालगड' ठेवले.
सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटल्यानंतर महाराज पन्हाळ्याहून याच विशालगडाकडे निघाले होते. या प्रवासात त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि 600 विश्वासू मावळे होते.
विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मृत्यूशी झुंज दिली. महाराजांना गडावर सुरक्षित पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
बाजीप्रभू आणि मावळ्यांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणूनच तिला पुढे 'पावनखिंड' असे नाव पडले. हा इतिहास आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो.
हा किल्ला सह्याद्रीच्या अत्यंत दुर्गम भागात आहे. चोहोबाजूंनी खोल दऱ्या आणि घनदाट जंगल असल्यामुळे शत्रूला हा किल्ला जिंकणे अशक्यप्राय होते.
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही या किल्ल्याला धोरणात्मक महत्त्व होते. अनेक मोहिमांचे नियोजन आणि मुघलांविरुद्धचा लढा याच गडावरुन दिला गेला.
राजारामांच्या काळात रामचंद्रपंत अमात्य यांनी विशालगडावरुनच स्वराज्याचा कारभार पाहिला. याच गडावरुन संताजी आणि धनाजींनी मुघल सैन्याला सळो की पळो करुन सोडले होते.
गडावर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू यांच्या समाध्या आहेत. याशिवाय गडावर हजरत मलिक रेहान दर्गा आणि अनेक प्राचीन मंदिरे ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात.