Vishalgad Fort: खोला दऱ्या आणि उंच कडे...! मोगल आणि इंग्रजांशी शेवटपर्यंत झुंज देणारा छत्रपतींचा 'विशालगड'

Manish Jadhav

विशालगड

विशालगड, ज्याला खेळणा किल्ला म्हणूनही ओळखले जात असे, हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि रोमांचक घटनांचा साक्षीदार आहे.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

शिवाजी महाराजांनी जिंकलेला गड

1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला आणि त्याचे नाव 'खेळणा' बदलून 'विशालगड' ठेवले. स्वराज्याच्या विस्तारात या किल्ल्याचे मोठे योगदान आहे.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

पावनखिंड संग्रामाचा आरंभबिंदू

1660 मध्ये सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला, तेव्हा याच विशालगडाकडे कूच करण्यासाठी महाराजांनी पन्हाळगडाहून धोकादायक मार्गाने पलायन केले. ही मोहीम 'पावनखिंडच्या लढाई' साठी (Battle of Pavankhind) प्रेरणास्थान ठरली.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

बाजिप्रभू देशपांडेंचा पराक्रम

महाराजांना विशालगडावर सुरक्षित पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत (जी नंतर पावनखिंड म्हणून ओळखली गेली) आपल्या प्राणांची आहुती दिली. यामुळेच महाराजांना विशालगडावर पोहोचता आले आणि हा किल्ला त्यांच्या पराक्रमाचा अंतिम टप्पा ठरला.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

मोगलांशी संघर्ष

छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात विशालगड हा स्वराज्याच्या राजकारणाचे केंद्र बनला होता. मोगलांपासून स्वराज्याला वाचवण्यासाठी हा किल्ला अनेक वर्षांपर्यंत लढला.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

दुर्भेद्य नैसर्गिक रचना

हा किल्ला नैसर्गिकरीत्या अत्यंत दुर्भेद्य आहे. खोल दऱ्या आणि उंच कड्यांमुळे तो शत्रूंसाठी सहज जिंकता येत नव्हता. 'खेळणा' हे नावही त्याच्या डोंगराच्या नैसर्गिक रचनेमुळे पडले होते.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

रामचंद्रपंत अमात्यांचे कार्यस्थान

छत्रपती राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार सांभाळणारे महान प्रशासक रामचंद्रपंत अमात्य यांनी काही काळ या किल्ल्यावरूनच कामकाज पाहिले.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

1818 पर्यंतचा लढा

मराठा साम्राज्याच्या अस्तापर्यंत, म्हणजे इ.स. 1818 पर्यंत विशालगड मराठ्यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी मराठा साम्राज्यातील अनेक किल्ले ताब्यात घेतले, तेव्हा या किल्ल्याने महत्त्वपूर्ण लढा दिला.

Vishalgad Fort | Dainik Gomantak

सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व

किल्ल्यावर आजही अमृतश्वर मंदिर आणि पीर सैय्यद अली दरगाह अस्तित्वात आहेत, जे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक समनव्याचे प्रतीक आहेत.

Pratapgad Fort: नेपाळहून भवानी मातेची मूर्ती आणली... शिवाजी महाराजांच्या शौर्याची कहाणी सांगणारा 'प्रतापगड'

आणखी बघा