Sameer Amunekar
१२ मे रोजी जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतरही कोहली एकदिवसीय सामने खेळत राहील.
दरम्यान, कोहलीच्या निवृत्तीमुळे सचिन तेंडुलकरचा एक महान विक्रम थोडक्यात मोडण्यापासून वाचला आहे, असंच म्हणावं लागेल कारण विराट आता फक्त वनडे सामन्यात खेळताना दिसणार आहे.
सचिन तेंडुलकर अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. त्याने ६६४ सामन्यांमध्ये १०० शतके केली आहेत.
तर विराट कोहलीने आतापर्यंत ५५० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८२ शतके केली आहेत.
विराट कोहली हा विक्रम मोडू शकला असता, पण त्यानं निवृत्तीची घोषणा केलीय. त्यामुळं विराट सचिनचा हा विक्रम इतर कोणी मोडणं अशक्य आहे, असं म्हणू शकतो. कारण विराट आता फक्त वनडे सामन्यात खेळणार आहे. त्याला १०० शतक करणं अवघड आहे.