Manish Jadhav
बीसीसीआयने शुभमन गिलला (Shubman Gill) आता वनडे (ODI) क्रिकेटमध्येही भारतीय संघाचे कर्णधारपद दिले आहे. तो पहिल्यांदाच वनडेत नेतृत्व करेल.
गिलकडे ऑस्ट्रेलियात होणारी वनडे मालिका जिंकून विराट कोहलीच्या (Virat Kohli) खास विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1980 पासून वनडे मालिका सुरु झाली, पण ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने आजपर्यंत केवळ एकदाच मालिका जिंकली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियात एकमेव वनडे मालिका विजय 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवला होता.
तीन सामन्यांच्या त्या मालिकेत पहिला सामना हरल्यानंतर कोहलीच्या संघाने जबरदस्त पुनरागमन करत दुसरे (6 विकेट्सने) आणि तिसरे (7 विकेट्सने) सामने जिंकून मालिका ताब्यात घेतली होती. आता गिलकडे ही सुवर्णसंधी आहे.
गिलने यापूर्वी टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून काम केले आहे, पण वनडेत त्याचा हा पहिलाच अनुभव असेल.
ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणे हे गिलसाठी सर्वात मोठे आणि कठीण आव्हान असेल, पण यशस्वी झाल्यास त्याच्या कर्णधारपदाची दमदार सुरुवात होईल.
आता गिल या मालिकेत विराट कोहलीने केलेला पराक्रम दुसऱ्यांदा करुन दाखवतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.