Manish Jadhav
सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यातील दुर्गम वासोटा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या भक्कम संरक्षणासाठी जिंकला होता.
प्रतापगड युद्धाच्या पार्श्वभूमीवर, 1655-56 मध्ये मोरे घराण्याकडून वासोटा हस्तगत करणे महाराजांच्या जावळी विजयाचा महत्त्वाचा टप्पा होता.
किल्ल्याच्या अक्राळविक्राळ रुपामुळे महाराजांनी त्याचे 'व्याघ्रगड' असे नाव ठेवले होते, मात्र 'वासोटा' हे नावच आजही प्रसिद्ध आहे.
महाराजांच्या देखरेखीखाली वासोटा किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अधिक मजबूत करण्यात आले होते, जे आजही पाहायला मिळतात.
डोंगरदऱ्यांनी वेढलेला आणि अभेद्य नैसर्गिक तटबंदी असलेला हा किल्ला महाराजांच्या काळापासून सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता.
ऐतिहासिक नोंदीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सातारा दौऱ्यादरम्यान काही काळ वासोटा किल्ल्यावर वास्तव्य केले होते.
कोयना अभयारण्यातील निसर्गसौंदर्य आणि बोटीने प्रवासाचा थरारक अनुभव देणारी वासोटा ट्रीप सध्या पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.