Manish Jadhav
विजय हजारे ट्रॉफीमध्ये तमिळनाडूकडून खेळताना वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकते.
गुरुवारी (9 जानेवारी) वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर राजस्थानविरुद्धच्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यात तमिळनाडूकडून खेळताना वरुणने पाच विकेट्स घेतल्या आणि बॅटने धावाही केल्या.
राजस्थानला 267 धावांवर रोखण्यात वरुण चक्रवर्तीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अभिजीत तोमर आणि महिपाल यांच्यातील 160 धावांची भागीदारी मोडली.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये वरुण सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 6 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने दोनदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.
तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 2024 मध्ये वरुण चक्रवर्तीने भारतीय टी-20 संघात पुनरागमन केले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यात 12 विकेट्स घेतल्या.