Sameer Amunekar
पावसाळ्यात तुळशीला वारंवार पाणी देण्याची गरज नसते. कुंडीत पाणी साचल्यास मुळं कुजण्याची शक्यता असते.
कुंडीच्या तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रं असणं आवश्यक आहे. पाणी साचत असेल तर कुंडी बदला.
तुळशीला सूर्यप्रकाशाची गरज असते. पावसाळ्यातही रोज काही तास अप्रत्यक्ष किंवा सौम्य सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी रोप ठेवा.
गळलेली, पिवळी किंवा खराब झालेली पानं नियमितपणे काढून टाका. त्यामुळे झाडाची ऊर्जा नवीन पालवी वाढवण्यासाठी वापरली जाते.
चिकट आणि पाणी धरून ठेवणारी माती टाळा. मातीमध्ये कोकोपीट, वाळू किंवा सेंद्रिय खत मिसळल्यास निचरा चांगला होण्यास मदत होते.
तुळशीची वाढ चांगली होण्यासाठी महिन्यातून एकदा थोडं कंपोस्ट किंवा चांगलं कुजलेलं सेंद्रिय खत वापरू शकता. अति खत देऊ नका.
तुळशीच्या रोपाची वरची वाढलेली टोकं हलकी छाटल्यास बाजूच्या फांद्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोप अधिक डेरेदार आणि दाट दिसू शकतं.