Sameer Amunekar
सावंतवाडीचे ऐतिहासिक वैभव जपणारा राजवाडा हा हिवाळ्यात पाहण्यासारखा सुंदर आणि शांत परिसर आहे. येथे लाकडी कलाकारी, हस्तकला आणि पारंपारिक संस्कृतीचा अनुभव घेता येतो.
शहराच्या मध्यभागी असलेला मोटी तलाव हा सावंतवाडीचा मुख्य आकर्षण. हिवाळ्यात तलावाच्या निळसर पाण्यावरून पेडल बोटने फेरफटका मारणे खूपच रोमँटिक आणि रिलॅक्सिंग वाटते.
सावंतवाडीपासून थोड्याच अंतरावर असलेले अंबोली हे सह्याद्रीतील सर्वात थंड आणि धुक्याने भरलेले हिल स्टेशन. हिवाळ्यात धुक्याची जादू, धबधबे आणि व्याघ्रेश्वर पॉइंट अप्रतिम पाहण्यासारखे असतात.
हिवाळ्यात गर्दी कमी असल्यामुळे येथील प्रसिद्ध लाकडी गंजिफा पत्ते, शोभेच्या वस्तू आणि खेळणी मनसोक्त निवडून घेता येतात. कला जपणारं हे ठिकाण पर्यटकांना भावते.
जवळील गावांमध्ये ग्रामीण जीवनशैली, कोकणी खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य रस्ते, नारळ-फणस-आंब्याची बागायती आणि हिवाळ्यातील अनोखी शांतता अनुभवता येते.
वेंगुर्ला येथे सुंदर समुद्रकिनारा आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. सावंतवाडीपासून हे ठिकाण हाकेच्या अंतरावर आहे.
मालवण येथेही सुंदर समुद्रकिनारा आहे. येथील सिंधुदुर्ग किल्ला पाहता येतो.