गोमन्तक डिजिटल टीम
वाहतूक पोलिसांनी राज्यभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत ३३७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
हेल्मेटविना दुचाकी चालवणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवणे ही सर्वाधिक नोंदवलेली प्रकरणे आहेत. या दोन्ही कारणांसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला आहे.
१६१ दुचाकीस्वार हेल्मेट न घालता प्रवास करत होते.
भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या ६१ वाहनचालकांवर कारवाई झाली.
वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
ही विशेष मोहीम येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.