Sameer Amunekar
भारतातील निसर्ग विविधतेने नटलेला आहे. डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे, नद्या, झरे – प्रत्येक घटकाचं आपलं वेगळंच सौंदर्य आहे. पण काही ठिकाणी असा अनुभव मिळतो जिथे डोंगर आणि समुद्र एकत्र येतात
कोकणातील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं असून मागे सह्याद्री पर्वतरांगांची रेखा आहे. येथे श्री गणेशाचे प्राचीन मंदिर असून, अरबी समुद्राच्या निळ्याशार लाटा आणि हिरवीगार डोंगररांगा यांचं सुंदर मिश्रण अनुभवायला मिळतं.
येथील समुद्रकिनारा स्वच्छ आणि कमी गर्दीचा आहे. समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला छोटे डोंगर, नारळी-पोफळीची झाडं आणि खाड्यांचा नजारा पाहायला मिळतो. समुद्र आणि डोंगर यांचं हे संयोजन मन मोहून टाकणारं आहे.
गोव्याच्या सीमेपासून जवळच असलेलं हे ठिकाण समुद्रकिनारा आणि पर्वतरांगांचं सुरेख मिलन दाखवतं. येथे पश्चिम घाटाची रांग समुद्राच्या जवळ पोहोचलेली आहे, त्यामुळे एकाच वेळी डोंगरदऱ्या आणि लाटांचा अनुभव घेता येतो.
गोव्याच्या तुलनेने शांत असलेला हा समुद्रकिनारा मागे उंचसखल डोंगराच्या रांगांनी वेढलेला आहे. इथली निसर्गरम्य शांतता, हिरवळ आणि समुद्राचं निळं रूप एकत्रितपणे सौंदर्याचा अनोखा अनुभव देतात.
वसईच्या पुढे असलेला हा परिसर जिथे पश्चिम घाटाच्या काही भागांचा शेवट होतो आणि समुद्रकिनाऱ्याची सुरुवात होते. खास करून सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी डोंगररांगांवर पडणाऱ्या किरणांचा आणि समुद्राच्या लाटांचा अनुभव अप्रतिम असतो.