Akshata Chhatre
एअर इंडियाचं विमान AI 171 (Boeing 787‑8) अहमदाबादहून लंडनकडे जाताना टेकऑफनंतर मेघानी नगर परिसरात क्रॅश झालं. या अपघातात 242 प्रवासी अधिक 12 केबिन क्रूसह 2 पायलट उपस्थित होते.
7 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या या विमान अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेस 1344 (Boeing 737‑8HG) मध्ये 21 प्रवासी ठार, 110 जखमी तर 169 बचाव करण्यात आला होता. पावसाळ्यातील टेबलटॉप रनवेवरून ओव्हररन झाल्याने ही दुर्घटना घडली होती.
22 मे 2010 रोजी झालेल्या एअर इंडिया एक्सस्प्रेस 812 (Boeing 737‑800) या विमान दुर्घटनेत रनवे ओव्हररनमध्ये 158 ठार झाले होते तर 8 जणांचा बचाव करण्यात यश आलं होतं.
17 जुलै 2000 मध्ये झालेल्या ऑलिअन्स विमान 7412 (Boeing 737‑200) दुर्घटनेत 60 प्रवासी मृत्यू पावले होते.
अहमदबाद येथे 19 ऑक्टोबर 1988 रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत (Boeing 737‑200) कंट्रोलचा अभावामुळे 133 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
1 जानेवारी 1978 मध्ये मुंबई येथे झालेल्या एअर इंडिया 855 (Boeing 747‑237B) टेकऑफनंतर इंजिन उपकरण खराबीमुळे समुद्रात पडून सर्व 213 प्रवासी मृत्यू पावले होते.