Manish Jadhav
मुले पालकांचे अनुकरण करतात. जर तुम्ही स्वतः जेवताना मोबाईल वापरत असाल, तर मुलेही तेच करणार. त्यामुळे आधी पालकांनी जेवताना फोन बाजूला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
घरातील जेवणाचे टेबल किंवा जेवणाची जागा 'मोबाईल मुक्त' ठेवा. जेवताना टीव्ही, टॅब किंवा मोबाईल जवळही राहणार नाही याची शिस्त लावा.
जेवण ही संवादाची वेळ आहे. मुलांच्या शाळेत काय झाले, त्यांना काय आवडते यावर गप्पा मारा. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता, तेव्हा त्यांचे लक्ष मोबाईलकडे जात नाही.
भाजी निवडणे, ताट वाढण्यात यामध्ये मुलांची मदत घ्या. स्वतः तयार केलेल्या अन्नाबद्दल त्यांना कुतूहल निर्माण होईल आणि ते मोबाईलशिवाय आनंदाने जेवतील.
जेवणाची एक ठराविक वेळ ठेवा. वेळेवर भूक लागली की मुले जेवणावर लक्ष केंद्रित करतात. भूक नसताना जेवायला बसवल्यास ते वेळ घालवण्यासाठी मोबाईलची मागणी करतात.
जेव्हा तुमचे मूल मोबाईलशिवाय जेवण पूर्ण करते, तेव्हा त्याचे कौतुक करा. "आज तू खूप शहाण्यासारखं जेवलास" असे म्हटल्याने मुलाला प्रोत्साहन मिळते.
मुलांना अन्नाचा रंग, चव आणि सुवास याबद्दल सांगा. अन्नाचा आनंद घेऊन खाल्ल्याने मेंदूला तृप्ती मिळते, जी मोबाईल बघून जेवताना मिळत नाही.
ही सवय एका दिवसात सुटणार नाही. सुरुवातीला 10-15 मिनिटे मोबाईलशिवाय जेवण्याचा सराव करा आणि हळूहळू पूर्ण जेवण मोबाईलशिवाय करण्याची सवय लावा.