Akshata Chhatre
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यासारखी ‘मेड फॉर इच अदर’ जोडीदेखील कधीमधी दुरावते. पण ब्रेकअप हा एकच मार्ग असतो का?
तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीवर नाराजी आहे? तर स्पष्ट तक्रार करा. दोषारोप केल्यास नात्यात कटुता वाढते.
ज्यामुळे त्रास झाला, जे अंतर वाढवायला कारणीभूत ठरलं, ते स्पष्टपणे पण नम्रपणे सांगा. तुमच्या जोडीदाराची चूक इतकी मोठी आहे का की तिला माफ करणं अशक्य आहे? प्रामाणिकपणे उत्तर द्या.
नातं टिकवण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याचं संतुलन साधणं अत्यावश्यक आहे.
त्या सुरुवातीच्या खास आठवणी त्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याची कारणं आठवा. त्या अजूनही तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत का?