Sameer Amunekar
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडला हरवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.
दुबईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला.
भारत उपांत्य फेरीत कोणत्या संघाशी सामना करेल हे देखील निश्चित झाले आहे.
भारतीय संघ 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल, तर दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी लाहोर येथे न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल.
भारताच्या विजयात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनं दमदार गोलंदाजी केली.
वरुणने न्यूझीलंडच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. वरुणने 10 षटकांत 42 धावा देत 5 विकेट घेतल्या.