Manish Jadhav
उन्हाळ्यात कलिंगड आणि आंबा या दोन्ही फळांचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि थंडावा मिळतो.
कलिंगडामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे घामावाटे शरीरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची कमतरता भरुन निघते.
आंब्यामध्ये विटामिन 'ए' आणि 'सी' मुबलक प्रमाणात असते, जे कडक उन्हात तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते.
या फळांमधील अँटी-ऑक्सिडंट्स सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतात.
आंब्यामध्ये असलेल्या फायबरमुळे उन्हाळ्यात होणारा अपचनाचा त्रास कमी होतो आणि पोट साफ राहण्यास मदत होते.
उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी कलिंगडातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सची पातळी संतुलित ठेवतात.
नियमितपणे या फळांचा आहारात समावेश केल्यास 'सनस्ट्रोक' किंवा उष्माघाताचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
उन्हामुळे गळून गेल्यासारखे वाटत असल्यास, आंब्यातील नैसर्गिक साखर शरीराला तात्काळ ऊर्जा देऊन ताजेतवाने करते.