Sameer Amunekar
उन्हाळ्यात गारवा आणि निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर मनाली हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
उन्हाळ्यात गारवा आणि हिरवाईचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर महाबळेश्वर सर्वोत्तम पर्याय आहे. थंड हवामान, धुकेभरलेली दऱ्या, आल्हाददायक वारा आणि स्ट्रॉबेरीच्या बागा ही सगळी मजा महाबळेश्वरमध्ये अनुभवता येते.
दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, जे आपली थंड हवा, वाफाळता चहा आणि अप्रतिम हिमालयीन दृश्यांसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला माउंट कांचनजंगाचे विहंगम दृश्य, हिरवेगार चहा मळे पाहायला मिळतील.
कुर्ग, ज्याला 'कर्नाटकमधील स्कॉटलंड' असेही म्हणतात, हे भारतातील एक सुंदर आणि शांत हिल स्टेशन आहे. हिरवाईने नटलेले पर्वत, कॉफीच्या मळ्यांचा सुगंध आणि थंड हवामान यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकिंग उत्साहींसाठी बेस्ट आहे.
माउंट आबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन असून, अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. राजस्थानच्या उष्ण हवामानापासून सुटका मिळवण्यासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, जे सुंदर समुद्रकिनारे, नाईटलाईफ, वॉटर स्पोर्ट्स आणि ऐतिहासिक चर्चेसाठी प्रसिद्ध आहे.