Monsoon Diet Tips: पावसाळ्यात 'हे' खाद्यपदार्थ खात असाल तर सावधान; आरोग्यासाठी घातक

Manish Jadhav

मॉन्सून

गोव्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले आहे.

Rain | Dainik Gomantak

संसर्गाचा धोका

पावसाळ्यात कीटक, डास आणि जंतूंचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे पावसाळ्यात संसर्गचा धोका वाढतो. पावसाळ्यात आरोग्याबरोबर आहाराची देखील काळजी घ्यावी लागते.

Rain | Dainik Gomantak

खाद्यपदार्थ

आज (13 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून कोणत्या खाद्यापदार्थांचे सेवन टाळावे याविषयी जाणून घेणार आहोत...

fish | Dainik Gomantak

मासे

पावसाळ्यात मासे खाणे टाळावे. या ऋतूत बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात, विशेषतः ओल्या जागी. त्यामुळे ते खाल्ल्याने संसर्गाचा धोका वाढतो. 

fish | Dainik Gomantak

तळलेले पदार्थ

पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे मसालेदार आणि तळलेले अन्न पचण्यास कठीण होते. भजी, समोसे, चिप्स आणि इतर तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

bhaji | Dainik Gomantak

हिरव्या पालेभाज्या

पावसाळ्यात पालक, मेथी, मोहरी इत्यादी हिरव्या भाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो.

Green leafy vegetables | Dainik Gomantak

कापलेली फळे

कापलेली फळे बाजारात किंवा रस्त्यावरील विक्रेत्यांकडे बराच काळ ठेवली जातात, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीचा धोका वाढतो. 

Fruits
आणखी बघा