Sameer Amunekar
सतराव्या शतकात पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६४ मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचा आदेश देत मराठा आरमाराला भक्कम आधार दिला.
प्रमुख शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३,००० हून अधिक कारागिरांनी हा भव्य सागरी किल्ला तीन वर्षांत पूर्ण केला.
लपवलेले प्रवेशद्वार, प्रचंड दगडी तटबंदी आणि मजबूत बुरुज यामुळे शत्रूंना किल्ल्यात प्रवेश करणे अत्यंत कठीण होते.
सिंधुदुर्ग किल्ला मराठ्यांच्या नौदलाचा महत्त्वाचा तळ होता. याच ठिकाणाहून सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवले जात असे.
अरबी समुद्राच्या मध्यभागी मालवण किनाऱ्याजवळ उभा असलेला हा किल्ला आजही मराठ्यांच्या शौर्याची आणि सागरी सामर्थ्याची साक्ष देतो.
सिंधुदुर्ग किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या सागरी वारशाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे अजरामर प्रतीक आहे.