Manish Jadhav
उन्हाळ्यात कडक ऊन आणि घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण आधीच कमी झालेले असते. अशात अतिप्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
चहामध्ये 'कॅफिन' असते, जे लघवीचे प्रमाण वाढवते (Diuretic). उन्हाळ्यात चहा जास्त प्यायल्याने शरीरातील पाणी वेगाने बाहेर पडते आणि डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.
चहाचा स्वभाव मुळात उष्ण असतो. उन्हाळ्यात चहा प्यायल्याने शरीराची अंतर्गत उष्णता आणखी वाढते, ज्यामुळे अस्वस्थता आणि जास्त घाम येण्याचा त्रास होतो.
रिकाम्या पोटी किंवा कडक उन्हात चहा घेतल्याने पोटात अॅसिडचे प्रमाण वाढते. यामुळे छातीत जळजळ, गॅसेस आणि अपचनाचा त्रास उद्भवतो.
चहामधील 'टॅनिन' हे घटक अन्नातील लोह शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात. उन्हाळ्यात सतत चहा प्यायल्याने शरीरात अशक्तपणा आणि लोहाची कमतरता भासू शकते.
कॅफिनमुळे मेंदू उत्तेजित होतो. उन्हाळ्याच्या दिवसात आधीच उष्णतेमुळे झोप कमी लागते, त्यात चहाच्या अतिसेवनाने निद्रानाशाची (Insomnia) समस्या गंभीर होऊ शकते.
जास्त चहा प्यायल्याने हाडांमधील कॅल्शिअम कमी होऊ लागते. उन्हाळ्यात शरीराची चयापचय शक्ती बदललेली असते, अशा वेळी चहा हाडांच्या ठिसूळपणाला कारणीभूत ठरु शकतो.
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि पुरळ येण्याची शक्यता असते. चहामुळे रक्तातील उष्णता वाढून त्वचेवर रॅशेस देखील येऊ शकतात.
उष्णता आणि कॅफिनचे मिश्रण शरीरात कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढवते. यामुळे उन्हाळ्यात विनाकारण चिडचिड होणे, घबराट होणे किंवा धडधड वाढणे असे त्रास होतात.