Akshata Chhatre
हिवाळ्यात फळे खाल्ल्याने सर्दी होते, हा एक मोठा गैरसमज आहे. उलट याच फळांमधील पोषक घटक तुम्हाला थंडीशी लढण्याची ताकद देतात.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे संक्रमण रोखण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.
पेरू केवळ पचन सुधारत नाही, तर त्यातील पोषक घटक तुमच्या हृदयाचे रक्षण करतात आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करतात.
वाढते प्रदूषण आणि रक्ताची कमतरता या दोन्ही समस्यांवर डाळिंब हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. हे शरीराला आतून शुद्ध करते.
तुमची रोगप्रतिकारशक्ती वेगाने सुधारायची असेल, तर कीवीला आपल्या आहारात नक्की स्थान द्या. हे फळ पचनसंस्थेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे.
स्ट्रॉबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे हिवाळ्यातील आळसामुळे वाढणारे वजन नियंत्रणात राहते आणि हृदयही तंदुरुस्त राहते.
दररोज एक हंगामी फळ खाल्ल्याने केवळ आजारच दूर राहत नाहीत, तर तुमच्या केसांची आणि त्वचेची नैसर्गिक चमकही कायम राहते.