Sameer Panditrao
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या विवाहानंतर तीन चार वर्षांनी शहाजी महाराजांनी सर्वांना बंगळूरास बोलावले. अनेक वर्षाने सर्व कुटुंबाची भेट झाली.
या भेटीत शहाजीराजांनी तरुण महाराजांना आदिलशहाची राजधानी विजापूर दाखवण्यास नेले.
महाराजांनी या भेटीत आदिलशहाची ताकत, त्याचे वैभव पाहिले.
या भेटीत त्यांना विजयनगर साम्राज्याचे कसे हाल झाले, त्यांची संपत्ती कशी लुटली गेली याची माहिती मिळाली.
विजापुरात त्यांनी गुलामांचे हाल पाहिले.
गोरगरीब जनतेला कसा त्रास दिलं गेला, मंदिरे कशी उद्ध्वस्त झाली या संताप आणणाऱ्या गोष्टी ऐकल्या.
या सगळ्या गोष्टी महाराजांच्या मनावर खोल परिणाम करत गेल्या आणि स्वराज्य स्थापन करण्याच्या त्यांचा विचार आणखी बळकट झाला.