Manish Jadhav
स्वराज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणाऱ्या किल्ले रायगडवरच महाराजांनी आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस व्यतीत केले. हा किल्ला त्यांच्या पराक्रमाचा आणि स्वप्नांचा साक्षीदार आहे.
मार्च 1680 च्या सुमारास महाराजांची प्रकृती बिघडली. सततच्या मोहिमा आणि स्वराज्याची चिंता यामुळे त्यांना तीव्र ताप भरला होता. याच आजारपणात त्यांनी रायगडवर विश्रांती घेतली.
प्रकृती साथ देत नसतानाही महाराजांचे लक्ष स्वराज्याच्या सीमांच्या संरक्षणाकडे होते. रायगडवरुनच त्यांनी आपल्या सरदारांना आवश्यक त्या सूचना आणि आज्ञा पाठवल्या. त्यांनी आपल्या आज्ञेमध्ये स्वराज्याच्या रक्षणाची बतावणी केली होती.
असे म्हटले जाते की, शेवटच्या क्षणी महाराजांनी जगदीश्वराच्या मंदिरात प्रार्थना केली. रायगडच्या शांत वातावरणात त्यांनी आपल्या ईश्वराचे स्मरण करत अखेरचे दिवस घालवले.
रायगडच्या राजवाड्यात चैत्र शुद्ध पौर्णिमेला (हनुमान जयंती) दुपारच्या वेळी या महापुरुषाने जगाचा निरोप घेतला. रायगडचा आसमंत त्या दिवशी शोकसागरात बुडाला होता.
रायगडवरील जगदीश्वर मंदिर आणि त्यासमोर असलेली महाराजांची समाधी आजही त्यांच्या शेवटच्या मुक्कामाची साक्ष देते. येथील प्रत्येक दगड शिवरायांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो.
महाराजांच्या महानिर्वाणाची बातमी ऐकून रायगडावरील आणि स्वराज्यातील प्रत्येक मावळा पोरका झाला. स्वराज्याचा आधारस्तंभ कोसळल्याची भावना सर्वांच्या मनात होती.
रायगड हा केवळ किल्ला नसून शिवरायांच्या शेवटच्या श्वासाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे. आजही शिवप्रेमी रायगडावर नतमस्तक होतात, कारण तिथेच शिवरायांनी स्वराज्याची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवली.